mumbai news paper,mumbai news in marathi,navi mumbai news,mumbai news today rain,mumbai local news live,tv9 mumbai news,mumbai crime news,thane news

मुंबईच्या वाढत्या गर्दीत हरवत चालला आहे मराठी माणूस?

No comments



आज सगळीकडे पाहिलं तर प्रत्येक मराठी माणूस स्वतःच घरं घेण्यासाठी बदलापूर, विरार, नालासोपारा या ठिकाणी वावरत आहे. खरं तर जो मराठी माणूस काही काळा आधी लालबाग, परळ या ठिकाणी दिसत होता तो आटा फक्त त्या ठिकाणी नोकरीसाठीच दिसतो. आज एवढे मोठं-मोठे टॉवर उभे राहत आहेत. तिथे मराठी माणूस का घरं घेऊ शकत नाही. तर इथे प्रश्न येतो पगार - इनकम. "आमचा पगार एवढा नाही म्हणून आम्ही मोठ्या टॉवर मध्ये घरं घेऊ शकत नाही." पण इथे घरं घेणारे गुजराती आणि मारवाडी असतात तिथे ते घरं घेतात आणि मुंबई स्वतःच्या बापाची असल्या सारखा मिरवतात आणि आपण मात्र नोकरी लागल्यावर पगार आणि रिटायरमेंट नंतर पेन्शन याचीच वाट बघत राहतो. आपण आपल्या मुलांना शिकवतो चांगलं शिक्षण घे, नोकरी कर. पण ज्या कंपनी मध्ये आपण नोकरी करतो त्या कंपनीच्या मालकाच्या बापाने त्याला सांगितलेला असता कि तू धंदा कर. तो धंदा करतो त्याची जास्त कमावण्यासाठी आणि आपण त्याच्याकडे नोकरी करतो त्याची स्वप्न पूर्ण करण्यासाठी.
आज मुंबईत दिवसेंदिवस गर्दी वाढत चाली आहे. भीती वाटते कि या गर्दीत जर आपला मराठी माणूस हरवला तर?
त्यामुळे आत्ताच जागे व्हा आणि आपलं स्थान मिळवायला सुरुवात करा!
जय मराठी, जय महाराष्ट्र! 

No comments :

Post a Comment